Thursday, December 19, 2013

हल्लीची तरुण मुलं

हल्लीची तरुण मुलं आई वडिलांकडे २० हजार कशासाठी मागतील तर लेटेस्ट मोबाइल खरेदी करण्यासाठी. १८ वर्षाच्या सुनील मित्तलनेही आपल्या वडिलांकडे २० हजार मागितले. कशासाठी तर व्यवसाय करण्यासाठी. सायकलचे स्पेअर पार्टस बनविण्याचा व्यवसाय त्याने सुरूही केला, आणि एक दिवस सुनील मित्तलने मोबाइल क्षेत्रात " एअरटेल " नावाने ५० हजार कोटींचं साम्राज्य उभं केलं.
कारण त्याच्याकडे होती भव्य स्वप्न. त्याच्यासमोर आदर्श होता धीरूभाई अंबानींचा. आपणही अशीच झेप घ्यायला हवी ह्या ध्येयाने प्रेरित झालेल्या सुनीलने मग डीझेल जनरेटर आयात करायचा परवाना मिळवला. जपानच्या होंडा आणि सुझुकी ह्या बड्या कंपन्यांचे डीझेल जनरेटर तो आयात करू लागला. धंद्यात चांगला जम बसला असं वाटत असतानाच अचानक भारत सरकारने डीझेल जनरेटर आयात करण्यार बंदी आणली आणि एका रात्रीत सुनील अक्षरशः बेकार झाला.
आता काय करावं हा त्याच्यापुढे प्रश्न उभा राहिला. नवा उद्योग शोधण्यासाठी मग तो परदेशी गेला. तैवानमद्धे एका औद्योगिक मेळाव्यात त्याने प्रथमच पुशबटन टेलिफोन पाहिले. भारतात तेव्हा काळ्या रंगाचे अतिशय जड आणि अनाकर्षक फोने अस्तित्वात होते. सुनीलला ते इतके आवडले कि त्याने ते आपल्या देशात नेउन विकायचा निर्णय घेतला. परंतु असे फोने आयात करण्यावर बंदी होति. त्यावर त्याने नामी शक्कल लढवली. त्या फोनचे सुटे भाग त्याने तिकडून मागवले अन इथे त्याची जोडणी करून विक्रीला आणले. त्याच्या फोनची देशात तडाखेबंद विक्री झाली. सिमेन्सच्या सहकार्याने त्याने पुशबटन टेलिफोनचा कारखाना सुरु केला. आज भारती एन्टरप्राइझेस या नावाने हि कंपनी देशातील सर्वात मोठी कंपनी गणली जाते.
१९९४ मद्धे देशातील सर्वात पहिली मोबाइल सेवा सुनील मित्तलने एअरटेल नावाने दिल्ली आणि मध्य प्रदेशमद्धे सुरु केलीआणि देशात क्रांती घडली. त्यानंतर टाटा, बिर्ला, अंबानी, वोडाफोन असे रथी महारथी मोबाइल क्षेत्रात उतरले. पण सुनील मित्तलची एअरटेल त्या सर्वाना पुरून उरली. आज एअरटेलची वार्षिक उलाढाल ४५ हजार कोटी तर निव्वळ नफा पाच हजार कोटी आहे. त्याशिवाय भारती एंटरप्राइज हा ग्रुप इन्सुअरन्स, औषध क्षेत्रातहि कार्यरत आहे. २००७ मद्धे सरकारने त्यांना पद्म भूषण किताब देऊन त्यांच्या कर्तुत्वाचा गौरव केला.
मित्रानो, खोल समुद्रापेक्षा जहाजं बंदरात अधिक सुरक्षित असतात, म्हणून काही ती बंदरात उभी करायला बनवली जात नाहित. १८ वर्षाच्या सुनील मित्तलला हे कॉलेजमद्धे असतानाच कळल होतं. मराठी तरुणांना हे कधी कळणार ? कालच देशात ३०० कोटी किंवा त्याहूनही जास्त संपत्ती असलेले ७ ० हजार लोक असल्याचे सरकारने जाहीर केलय. त्यांच्यामुळे आज अर्धा देश आपला उदरनिर्वाह करतोय. त्या श्रीमंतामद्धे मराठी माणूस एक टक्काही नसेल हे सांगायला नकोच.
मग हा मराठी माणूस करतो तरी काय ? बंदरातील सुरक्षित जहाजांप्रमाणे तो सुरक्षित नोकरी करतो. आणि फावल्या वेळात तो तासंतास टीवीवर क्रिकेटचे सामने तरी पाहतो किंवा प्रवासात किंवा नाक्यावर उभा राहून तासंतास राजकारणावर किंवा पुन्हा क्रिकेटवर निरर्थक चर्चा करत बसतो. गेल्या दोन पिढ्या त्याने कधी सुनील गावस्करसाठी तर कधी सचिन तेंडूलकरसाठी आपल्या आयुष्याची मोलाची वेळ खर्ची घातली. त्यामुळे धीरुभाई अंबानींचा आदर्श समोर ठेवायला त्याला वेळच मिळाला नाहि. बाप मुलाला वयाच्या ५ व्या वर्षीच क्रिकेटचे सामने बघायला टीवी समोर बसतो. मुलगा मग त्याचाच कित्ता गिरवत बसतो. तुम्हीही तेच करणार आहात. मग त्या ७० हजारचे जरी ७ लाख झाले तरी आपली टक्केवारी एक टक्काही नसेल हे सांगायला कोणा ज्योतिष्याची आवश्यकता नाही. तरीही आपण म्हणायचं जय हिंद ! जय महाराष्ट्र !

फुल टू धमाल

फुल टू धमाल
वडील अडाणी असतात
आणि मुलगा चांगला शिकलेला असतो.
ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent)
उभारतात आणि त्यात झोपी जातात.
काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात व म्हणतात
वडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय
दिसतंय..?
मुलगा: मला लाखो तारे दिसताहेत.
वडील: ते तुला काय सांगत आहेत?
मुलगा: खगोलशात्राज्ञानुसार ते सांगतात
कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत.
वडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत आहेत
कि आपला तंबू चोरीला गेला..
( शिक्षणाचा आणि कॉमनसेन्सचा काहीही संबंध नसतो)

Friday, December 13, 2013

हे साले मित्र सगळे असेच असतात

हे साले मित्र सगळे असेच असतात,
चिडवून सतावून जीव नकोसा करतात,  तरीही नेहमी हवेसेच वाटतात.
लग्नापूर्वी प्रेयसीला पाहून ' आयटम सही है' म्हणून चिडवतात , लग्ना नंतर तीलाच आदराने वहिनी अशी हाक  मारतात .े 
हे साले मित्र सगळे असेच असतात....
जेवताना एकमेकांच्या  डब्यावर सगळ्यांचीच नजर असते,  खास  पदार्थ  सर्वाना पुरेल ,याची मात्र खात्री नसते.
पण... एखाद्या दिवशी डबा नाही आणला, तरी  आपलेच ताट  इतरांपेक्षा जास्त भरते.
हे साले मित्र सगळे असेच असतात...
नाक्यावारती गप्पा मारताना..
तीन में पाँच - बिस्किट के ल चहाची अशी ओर्डर सुटते, बिल भरण्याची वेळ आली कि सर्वांचीच पांगा पांग होते ,
मात्र अचानक कधी बाबाना admit करावे  लागते,  आहोत आम्ही पाठीशी म्हणत advance नकळत भरले जाते.
हे  साले मित्र  सगळे  असेच असतात ...
अवचित एखादा  प्रसंग ओढावला तर सख्खे नातेवाईक ही पाठ फिरवतात, अशावेळी छळनारे हेच मित्र पाठीशी  भक्कमपणे उभे राहतात, रक्ताच्या  नात्या पेक्षा ही मैत्रीचे नाते  श्रेष्ठ  ठरवितात.
हे साले मित्र सगळे असेच असतात, चिडवून सतावून जीव नकोसा करतात,  तरीही नेहमी हवेसेच वाटतात.

दहावी पेपर- कारणे द्या

प्रश्नः (दहावी पेपर)- कारणे द्या;
गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे.
उत्तरः शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडूळ
त्याच्याशी गप्पा मारतो , म्हणून.
------------------------------------------
प्रश्न - संत तुकाराम याची थोडक्यात (३-४ ओळीत) माहिती लिहा.
उत्तर - संत तुकाराम हे संत होते.
त्यांचे नाव तुकाराम होते.
लोक त्यांना संत तुकाराम म्हणून ओळखत.
------------------------------------------
प्रश्न - कारणे द्या;
उन्हाळ्यात दिवस मोठा तर थंडीत लहान असतो.
उत्तर - एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते.
उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने दिवस प्रसरण पावून मोठा होतो,
तर थंडीत त्याउलट लहान होतो.
------------------------------------------
प्रश्न- खालील बाबतीत काय होईल ते सांगा-
जळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडा ठेवल्यास!
उत्तर- ग्लास काळा होईल.
------------------------------------------
प्रश्न- मराठीत भाषांतर करा.
चिडियां पेडपर चहचहाती हैं ।
उत्तर -चिमण्या झाडावर चहा पितात.....
------------------------------------------
धन्य तो शिकवणारा मास्तर आणि उत्तर लिहणारा पोरगा!!!

संस्कृत चे शिक्षक : तमसो-माँ ज्योतिर-गमयाँ
या ओळिचा अर्थ काय ?
.
.
.
.
.
.
बंड्या : तु झोपुन जा आई,
मी ज्योती च्या घरी जात आहे....
.
संस्कृत चे शिक्षक कोमात
बंड्या आपला जोमात...