Friday, October 11, 2013

'गाय' या विषयावर निबंध

सरांनी वर्गात मुलांना सांगितलं
'' उद्या येताना 'गाय' या विषयावर निबंध लिहून आणा...''
मग वाचा आपल्या 'गणप्या' ने लिहलेला निबंध

"अमेरिकेमध्ये मुलाला 'गाय' असे म्हणतात.
भारतात गवत खाणा-या प्राण्याला गाय असे म्हणतात. गाईला चार पाय आणि दोन कान असतात. गाईचे तोंड गायतोंडे सरांसारखे असते.

गायी फावल्या वेळेत शेपटीने माश्या मरतात.
मेलेल्या माशांचे सुकड बोंबील करतात. ते टेस्टी असते.
गायी गोठ्यामध्ये गाई-गाई करतात. गाय दूध देते पण आम्ही चितळ्यांचे दूध पितो.

गाईच्या 'शी'ला शेण असे म्हणतात. शीला ताई शेणाच्या गौ-या करते. गाईच्या पिल्लाला वासरू असे म्हणतात. वसु बारसेला वासराचे बारसे करतात. गाईची पूजा होते.

पूजा मला आवडते. ती माझ्या शेजारी बसते. गाईला माता म्हणतात.

भारत माता की जय!!!!

Friday, October 4, 2013

एकदा वाचा… थोडा वेळ लागेल पण नक्कीच आवडेल...



एखादा छान ड्रेस आवडतो आपल्याला, दुकानात असलेल्या कपड्यांच्या गर्दीत तो साधा वाटतो, पण तरीही आवडतो पण काहीतरी दुसरे घेऊन बाहेर पडतो आपण....
परतताना मनात विचार येतो ‘तो ड्रेस घ्यायला हवा होता''.



सिग्नलला गाडी थांबते,
चिमुरडी काच ठोठावते. गोड हसते, पण भिक मागत आहे हे लक्षात घेऊन त्या हसण्याकडे फार लक्ष देत नाही आपण... २-३ रुपये द्यावे असे मनात येते...


रेंगाळत सुटे शोधता शोधता ‘देऊ का नको’ हा धावा मनात सुरू असतो, तेवढ्यात सिग्नल सुटतो, गाडी पुढे घ्यायची वेळ येते...
थोडे पुढे गेल्यावर मन म्हणते, ‘सुटे होते समोर, द्यायला हवे होते त्या चिमुरडीला'.


जेवणाच्या सुट्टीत ऑफिसातला मित्र त्याच्या घरातला त्रास फार विश्वासाने सांगतो, त्याच्या डोळ्यात व्यथांचे ढग दाटलेले दिसतात...
वाईट वाटते खूप, नशीब आपण त्या परिस्थितीत नाही असेही मनोमनी पुटपुटून आपण मोकळे होतो...
‘काही मदत हवी का?’ असे विचारायचे असूनही आपण गप्प राहतो." जेवणाची सुट्टी संपते...तो त्याच्या आणि आपण आपल्या कामाला लागतो...
क्षणभर स्वत:वर राग येतो, ‘मदत तर विचारली नाही, निदान खांद्यावर सहानुभूतीचा हात तरी ठेवायला हवा होता मी!


असेच होते नेहमी, छोट्या छोट्या गोष्टी राहून जातात,  खरं तर या छोट्या गोष्टीच जगण्याचे कारण असतात.
गेलेले क्षण परत येत नाहीत,

राहतो तो ‘खेद’, ….करता येण्यासारख्या गोष्टी न केल्याचा. जगण्याची साधने जमवताना जगणेच राहून जात नाहीयेना ते ‘चेक’ कर...






==================

"आनंद झाला तर हसा.. J, “


“वाईट वाटले तर डोळ्यांना बांध घालू नका".

“चांगल्या गोष्टीची दाद द्या, “


“आवडले नाही तर सांगा,घुसमटू नका.”

“त्या त्या क्षणी जे योग्य वाटते ते करा, नंतर त्यावर विचार करून काहीच साध्य नाही. “


“आयुष्यातल्या छोट्या गोष्टींना महत्त्व द्या,”

“त्या छोट्या क्षणांना जीवनाच्या धाग्यात गुंफणे म्हणजेच जगणे.”

“आवडलेल्या गाण्यावर मान नाही डुलली तर ‘लाईफ’ कसले?”

“आपल्यांच्या दु:खात डोळे नाही भरले तर लाईफ कसले?”

“मित्रांच्या फालतू विनोदांवर पोट दुखेस्तोवर हसलो नाही तर कसले लाईफ?”


“आनंदात आनंद आणि दु:खात दु:ख नाही जाणवले तर लाईफ कसले?... छोट्या क्षणांना जीवनाच्या धाग्यात गुंफणे म्हणजेच जगणे.”

Wednesday, July 31, 2013

तुम्हाला विनोदबुद्धी कुठून मिळाली (पु.ल.देशपांडे नसती उठाठेव)

P.L. Deshpande


तुम्हाला विनोदबुद्धी कुठून मिळाली ?
ह्या प्रश्नाचे उत्तर मला सुचवणाऱ्‍याला मी इष्टेट लिहून देईल. मला वाड-वडिलार्जित फक्त आजपर्यंत संधिवात मिळाला आहे. आजीला दमा होता, त्या वाटणीची मी अत्यंत आतुरतेने वाट पाहात आहे. विनोदबुद्धी कोण देणार? ज्याने मला डोळे दिले (चष्मा वगळून- तो मी विकत घेतला.) त्याखेरीज ते दातृत्व मी आणखी कुणाच्या वाट्यावर जमा करू? गणितातला कच्चेपणा, मी माझ्या एका मामाकडून मिळवला. चित्रककलेतील अधोगतीला एक दूरचा चुलता जिम्मेदार आहे. सिग्रेटी फुंकायचे व्यसन माझ्या एका आतेभावाने लावले. इतिहासाचा तिटकारा इतिहासाच्याच गुरूजींनी निर्माण केला! त्यामुळे शिवाजीचा गुढगी रोग मी औरंगजेबापर्यंत नेऊन पोचवला आहे, आणि इंग्लंडच्या गादीवरच्या चार्लसबरोबर अनेक हेन्री मंडळींची मुंडकी तिमाही - सहामाहीत ह्या हाताने उडवली आहेत. संगीताची आवड ही शेजारच्या घरात वेळीअवेळी पेटी बडवणार्या एका इसमावर सूड म्हणून उत्पन्न करून घेऊन त्याची पेटी बंद पाडली. नाटकात पहिली भूमीका मिळाली, ती 'नरवीर तानाजी मालुसरे' ह्या नाटकाच्या सोनावणे मास्तरांनी 'डायरेक्शण' केलेल्या प्रयोगात! तानाजी मेल्यावर जे मावळे पळतात, त्यांतला आघाडीवरचा मावळा म्हणून मराठी रंगभूमीला माझा चिमुकला पदस्पर्श झाला. "मूर्खांनो! तो दोर मी केव्हाच कापला आहे," हे सूर्याजीचे भाषण ज्या मूर्खांना उद्देशून होते त्यातला मी आघाडीचा मूर्ख! तिथे देखील उजव्या विंगेत कड्याच्या दिशेला न पळता उदेभानाच्या महालाच्या दिशेला पळाल्यामुळे डाव्या विंगेत उभ्या असलेल्या सोनावणे मास्तरांनी उजव्याहाताने माझ्या डाव्या गालफडावर एक सणसणीत 'डायरेक्शन' केलेले स्मरते. जीव बालमुठीत धरून मी पुन्हा एकदा तलवार आणि मावळी पागोटे सांभाळीत उजव्या विंगेत पळताना वाटेत आडव्या पडलेल्या तानाजीच्या छातीवर पाय देऊन पळालो होतो. असो; हे विषयांतर झाले. विनोदबुद्धीचा उगम माझ्या मानेवरील चामखिळीप्रमाणे केव्हा झाला हे अजिबात स्मरत नाही! -- (पु.ल.देशपांडे नसती उठाठेव.)

Wednesday, July 10, 2013

बोलक्या रेषा (Bolkya Resha)






















समजत नाही कि मी घडलो कि बिघडलो

हुशारी मिळवताना शहाणपण विसरलो
तंत्रज्ञानामागे धावताना आत्मज्ञान विसरलो
पैसा हीच शक्ती समजून ईश्वरभक्ती विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

...
सुख शोधताना जीवनाचा बोध विसरलो
सुखासाठी साधने वापरताना साधना विसरलो
भौतिक वस्तूच्या सुखात नैतिकता विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

धन जमा करताना समाधान विसरलो
तंत्रज्ञान शोधताना ते वापरण्याचे भान विसरलो
परिक्षार्थी शिक्षणात हाताचे कौशल्य विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो


टी.व्ही. आल्यापासून बोलणं विसरलो
जाहिरातीच्या मार्यामुळे चागलं निवडणं विसरलो
गाडी आल्यापासून चालणं विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

मोबाईल आल्यापासून भेटीगाठी विसरलो
कॅलक्युलेटर आल्यापासून बेरीज विसरलो
संगणकाच्या वापराने विचार करणं विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

संकरीत खाल्यामुळे पदार्थांची चव विसरलो
फास्टफूडच्या जमान्यात तृप्तीचे ढेकर विसरलो
.सी. मध्ये बसून झाडाचा गारवा विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

परफ्युमचा वापरामुळे फुलांचा सुगंध विसरलो
चातुर्य मिळवताना चरित्र विसरलो
जगाचा भूगोलात गावाचा इतिहास विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

बटबटीत प्रदर्शनात सौंदर्याचे दर्शन विसरलो
रिमिक्सच्या गोंगाटात सुगमसंगीत विसरलो
मृगजळामागे धावताना कर्तव्यातला आनंद विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

स्वतःमध्ये मग्न राहून दुस-‍याच्या विचार विसरलो
सतत धावताना क्षणभर थांबणं विसरलो
जागेपणी सुख मिळवताना सुखानं झोपणं विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो.

Wednesday, June 19, 2013

ट्रक किंवा रिक्षाच्या मागील साहित्य

ट्रक किंवा रिक्षाच्या मागील साहित्य हे कधी हसवणारे असते, कधी विचार करायला लावणारे असते.

'मेरा भारत महान'

"बघतोस काय ? मुजरा कर .....! "

बघतोस काय रागाने, ........ ओव्हरटेक केलय वाघाने!

"बघ, .... माझी आठवण येते का ?"

''पाहतेस काय प्रेमात पडशिल''

साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.

अं हं. घाई करायची नाही. !!!!!!!!

तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही

"गपगुमान माझ्या मागं मागं सांग-लीला येतीस का ?"

'तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..'

'अहो, इकडे पण बघा ना...'

"हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर".

थांब लक्षुमी कुंकू लावते!

तुमचे लक्ष आमच्याकडे का?

"लायनीत घे ना भौ"

चिटके तो फटके!

राजे तुम्हि पुन्हा जन्माला या

अयोध्या,बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,ह्युस्टन,सॅन्टा क्लारा,सनिव्हेल,फ्रिमॉन्ट्,हेवर्ड,बिजिंग ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.

१३ १३ १३ सुरूर !

"नाद खुळा"

"हाय हे असं हाय बग"

"सासरेबुवांची कृपा "

"आबा कावत्यात!"

पाहा पन प्रेमाणे

नवतीचा नखरा, गुलजार पाखरा, खरा न धरा, भैरोबा-भैरोबा स्मरा.

"हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात!"

अच्छा, टाटा, फिर मिलेंगे.

हरी ओम हरी, श्रीदेवी मेरी...

योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये ...आणि ...मुलांमध्ये..

वाट पाहिन पण एस टी नेच जाईन.

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

हेही दिवस जातील

नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा

घर कब आओगे?

१ १३ ६ रा

हॉर्न . ओके. प्लीज

"भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे"

एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून)
तुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं
माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं
याचा विचार करून गाडी चालवा

एका ट्रक च्या मागे लिहले होते: राजू, चिंटू , सोनू ....!
अणि खाली लिहले होते .....
बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने !

एका टेम्पोच्या मागे लिहिलेले: "मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल " आणि खाली लिहिले होते....
"ड्रायवर शिकत आहे" (बारीक़ अक्षरात)

एका टेम्पोच्या मागे..
आलात आनंद, बसलात अत्यानंद, उतरलात परमानंद!

Wednesday, June 12, 2013

मोठी माणसे म्हणतात.....

1)जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत. - नारायण मूर्ती

2)यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू शकणारनाही. पण स्वतःला ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे; हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय. -- विश्‍वनाथन आनंद

 3)नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्‍य आहे.** * -- धीरूभाई अंबानी

 4)पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवलातर वाढायला मदत करतो. * -- जे. आर. डी. टाटा

 5)फोटोग्राफरच्य­ ­ा एका"क्‍लिक'मुळे­ जगणे चिरकाल होते.*** -- रघू राय

6)चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो.* - बिल गेट्‌स

7)मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता. * - कल्पना चावला

8)कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.* -- बराक ओबामा

9)माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याचीतयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच. -- आयझॅक न्यूटन

10)मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा"माणूस' होणे; हे त्याचे यश आहे. -- सर्वपल्ली राधाकृष्णन*

Tuesday, April 23, 2013

Navra Bayko


Hindi marathi remix


Wednesday, February 20, 2013

Saturday, January 5, 2013

चितळ्यांची बाकरवडी


‎"चितळ्यांची बाकरवडी" 




ऐकीव पण इंटरेस्टिंग…चितळ्यांचं कुमठेकर रस्त्यावरील दुकान. वेळ रात्री आठ वाजता म्हणाजे दुकान बंद होण्याची.
मालक चितळे स्वत: कुलूप लावायच्या तयारीत..त्याच क्षणी एक माणूस बंद होणार्‍या शटरच्या खालून जवळपास लोळणघेत आत घुसला…चितळ्यांनी त्याला आडवायचा प्रयत्न केला पण तरीही तो चिवट माणूसशेवटी घुसलाच.
चितळ्यांनी खवळून त्याला काय पाहिजे म्हणून विचारलं…” बाकरवडी..” अपेक्षित उत्तर आले.
”किती वाजले घड्याळात…? आठ वाजले ते दिसत नाही. का घड्याळ चुकीची वेळ दाखवतंय..तसं असेल तर बाकरवडी ऐवजी घड्याळ घ्या… ” चितळे त्याच्यावर वतागले.
” मला बाकरवडी हवीय..”" मिळणार नाही.. दुकान बंद झालेय… उद्या या..”" बाकरवडी..”" शक्य नाही… आता बाहेर पडा आधी… “चितळ्यांचा संताप अनावर झाला. 
तो माणूस बाहेर पडत नाही हे बघूनचितळ्यांनी शटर ओढले आणि तो माणूस आणि चितळे स्वत: दुकानात कोंडले गेले.
दोन मिनिटांनी आतला वाद वाढला तशी बाहेर गर्दी जमा झाली.गर्दी वाढतच गेली तसे वादही वाढले. मग आतून मारामारीचे,आपटाआपटीचे आवाज ऐकायला येऊ लागले.. काहीतरी फुटल्याचे आवाजआणि माग कुणाचातरी जोरात ओरडण्याचा आवाज…गर्दी अवाक होऊन बघत होती.इतक्यात शटर परत किलकिले झाले आणि तो माणूस जिवाच्या आकांतानेबाहेर पडला आणि पळायला लागला…
मागोमाग चितळे बाहेर आले. चिडलेले, घामेजलेले पण तरीही चेहर्‍यावर एक समाधान घेऊन…” काय झालं हो…?”
गर्दीतून कुणीतरी विचारले.” बाकरवडी पाहिजे होती… आठ वाजल्यानंतर आत आला ..आणि नाही म्हटले तर हातघाईवरच यायला लागला…मग दाखवले चौदावे रत्न… आठ वाजता बाकरवडी मागतो म्हणजे काय…वेळेचे भान आहे की नाही..”" कोण होता हो…?” गर्दीतील उस्तुक प्रेक्षकाने विचारले…” होता कुणीतरी मद्रासचा भामटा … “शिवाजी गायकवाड” म्हणून… “चितळ्यांनी शटर ओढून कुलूप लावले आणि ते घराकडे निघाले…! ;-p ;-p ;-p