Saturday, August 16, 2014

लेखक : चंद्रशेखर गोखले यांची.. एंक खूप छान कथा...


A nice marathi story by Chandrashekhar Gokhale

कायद्याने दोघे वेगळे झाल्यावर त्याने राहतं घर विकायला काढलं
ब्रोकरच्या थ्रू तिच्या वडिलानीच ते घर विकत घेतलं..
पून्हा घराची एक किल्ली त्याच्या हातात देत म्हणाले... मी माझ्या लेकीला ओळखतो तसा तुलाही..
सगळ्या गोष्टी भावनेच्या भरात करतोस... अगदी माझ्या लेकीशी लग्न सुद्धा..
पून्हा भावनेच्या भरात एकत्र यावसं वाटलं तर?
तसं व्हायला नको.. म्हणून ही रिकामी वास्तू तुझ्या हवाली करतो.. कधी वाटलं तर येऊन बसत जा
भरल्या घरा पेक्षा रिकामं घर जास्त बोलतं आपल्याशी...
भावनेपेक्षा विचार जास्त ठाम असतात विचारांवर ठाम झालास तर घेतल्या निर्णयाचा पश्र्चाताप होणार नाही.. निर्णय ठाम झाला की माझी किल्ली मला परत दे
नाहीतर येऊन माझी मुलगी परत घेऊन जा...
आणि खरच तो ढळत्या दुपारी रिकाम्या घरात बसायला लागला.. कलंडणारी ऊन्ह आपल्या घरात अशी ऐसपैस पसरतात त्याला माहीतच नव्हतं.. मावळतीचा वारा अख्ख्या घराचा ताबा घेतो याची त्याला कल्प्नाच नव्हती..
एक चूकून राहिलेलं कँलेंडर होतं भिंतीवर वार्‍याने फडफडत होतं त्या फडफडण्याचा आवाज सुद्धा त्याला नवा होता... त्याने जवळ जाऊन बघितलं कसल्या कसल्या नोंदी त्यावर तिने करून ठेवल्या होत्या..कसली बीलं देण्याची तारीख, दूधाचा हिशोब, कामवालीचे खाडे,पेस्ट कंट्रोलची तारीख...सिलेंडर संपल्याची तारीख, ग्राहकचं सामान येण्याची तारीख...,इस्त्रीचे कपडे त्याचा हिशोब
या कशातच तो सहभागी नव्हता... अगदी तिच्या महिन्याच्या तारखा... तारीख पुढे गेलीतर....
त्याला गलबलूनच आलं या कशा कशातच आपण सहभागी नव्हतो.. ती एकटीचा डाव खेळत राहीली आणि आपण फक्त..तक्रार करत राहिलो..त्याला कँलेंडर समोर उभं राहणं शक्य होईना
तो बेडरूम मधे आला त्याने खिडकी उघडली खिडकीत तिने हौसेनं लावलेली शेवंती होती वाळून वाळून झूरायला आलेली तिला भिजवयला तो आतूर झाला कातर झाला.. पाणी घालायला भांड नव्हतं त्याने कूंडीच सींक मधे नेली यथेछ्च पाणी शिंपडलं तहानलेली शेवंती गटा गटा पाणी प्यायली.. आणि तोच तृप्त झाला..
तेव्ह्ढ्यात लँच कीने दार उघडल्याचा आवाज आला ती आली होती शेवंतीसारखीच .... तिला समोर बघून तो उनमळून गेला ... काय अवस्था करून घेतली आहे हिने... हिच्या आयुष्यातलं आपलं स्थान आपल्या लक्षात कसं आलं नाही? ... की आपण लक्षात घेतलं नाही?
जिद्दीला पेटून भांडते तेंव्हा ती कुठल्याही टोकाला पोहोचते हे काय आपल्याला लग्नाआधी माहीत नव्हतं?...
दोघांची नजरा नजर झाली... दोघे क्षणभरासाठी स्तब्ध
ती म्हणाली मी ही शेवंतीच न्यायला आले होते...
तो म्हणाला आत्ताच पाणी दिलय... तिचं निथळणं संपेपर्यंत थांब...
आणि ती थांबली...

No comments:

Post a Comment