मी मराठी: - हा कुठलाही फ़ुकटचा कोड कॉपी करुन देण्यासाठी बनविन्यात आलेला नाही. तसेच जे लोकांना एखादा विनोद एकणे,वाचणे म्हणजे वेळेचा अपव्यय (मराठीत टाईमपास) वाटतो त्यांच्यासाठी सुधा नाही. या ब्लॉगवरील सर्व साहित्या हे कुठल्या ना कुठल्या मेलधुन आलेले आहे व ते एका ठीकाणी ठेवायचे म्हणुन हा सगळा उद्योग केलेला आहे.(कानात ह्ळुच :- सर्व चोरलेले आहे) दोन घडी हसायचे असेल तरच इथे वेळ घालवा अन्यथा गुगल आहेच..... Marathi Poems, Marathi Jokes, Marathi Poems, Marathi Shayari and more
Wednesday, March 12, 2014
Monday, March 10, 2014
वपुर्झा - व. पु. काळे (Vapurza by V. P. Kale)
Vapurza - V.P.Kale (Va. Pu. Kale)
बारीक असतात,
पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात..!
तुटले तर श्वासानेही तुटतील,
नाहीतर वज्राघातेनेही तुटणार
नाहीत..!!
त्याच्यात तिसरा माणूस आला
की त्या गप्पा होतात..!!
कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे ..!
म्हणूनच खडक झिजतात
प्रवाह रुंदावत जातो..!!
पेटलेली काडीसुद्धा अपोआप
विझते..!!
हिशोब लागला नाही की त्रास
होतो..!!
शेवटपर्यंत असतात..!
पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर हे असतंच.
ते सोडवायला कधी वेळ हवा
असतो, कधी पैसा तर कधी
माणस..!
या तिन्ही गोष्टी पलीकडचा
प्रोब्लेम
अस्तित्वातच नसतो..!!
वारुळाप्रमाणे असतात..!
वारूळ पाहून आतमध्ये किती
मुंग्या असतील याचा अदमास
घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की
एकामागोमाग असंख्य मुंग्या
बाहेर पडतात. आठवणींचही
तसंच आहे..!!
घाबरलेला असतो, बरा झाल्यावर
शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो..!!
Sunday, March 9, 2014
राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली?
राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली? भारतातील प्रत्येक भाषेतील , प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर ठळक अक्षरात राष्ट्रीय प्रतिज्ञा छापलेली असते. पण आजवर ती कुणी लिहिली , तेच ठाऊक नव्हते. अगदी पाठ्यपुस्तक मंडळालादेखील. परंतु गेल्या वर्षी या प्रतिज्ञेच्या कर्त्याचे नाव अचानक उजेडात आले. त्याची शोधकथा... देशभरातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सर्वत्र एकसमान प्रतिज्ञा प्रत्येक विषयाच्या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच दिलेली असते. अनेक वर्षांपासून आपण नित्याचा परिपाठ म्हणून शाळा भरताना ही प्रतिज्ञा घेत असतो. परंतु ही प्रतिज्ञा कोणी लिहिली ? कधी लिहिली ? ती केव्हापासून देशभरातील पाठ्यपुस्तकांमध्ये आली , याची माहिती जवळपास कोणालाच दिसत नाही. मीही ही प्रतिज्ञा शालेय जीवनापासून म्हणत आलो.
बालवयात पाठ्यपुस्तकातील एखादा धडा किंवा कविता वाचली की , त्या पाठाखाली किंवा धड्याखाली त्या-त्या लेखकाचे , कवीचे नाव दिलेले असते. त्यामुळे मला बालपणापासूनच पाठ्यपुस्तकातली ही प्रतिज्ञा कोणी लिहिली असेल , असा प्रश्न पडला होता. मला शिकविणाऱ्या प्रत्येक वर्गातील शिक्षकाला मी हा प्रश्न विचारीत असे. परंतु कुणीच मला उत्तर देऊ शकले नाही. पुढे बऱ्याच शिक्षणाधिकाऱ्यांना , विद्वानांना , पाठ्यपुस्तक मंडळातील तज्ज्ञांना , शिक्षणमंत्री , साहित्यिक , लेखक , अ. भा. मराठी साहित्य महामंडळावरील सदस्य , तसेच जवळपास प्रत्येक शिक्षणतज्ज्ञाला या प्रश्नाचे उत्तर विचारले. सगळीकडूनच नकारघंटा आली. काहींनी सानेगुरुजी , यदुनाथ थत्ते असावेत असे सांगितले. पण समग्र सानेगुरुजी वाचल्यावरही संदर्भ लागला नाही. यदुनाथ थत्तेंनी या प्रतिज्ञेच्या आठ वाक्यांचा सविस्तर अर्थ विशद करणारे ' प्रतिज्ञा ' नावाचे पुस्तकच लिहिले आहे. या पुस्तकातही या प्रतिज्ञेच्या लेखकाचा कुठे उल्लेख आढळला नाही. पाठ्यपुस्तक मंडळातील काही व्यक्तींनी सुचविले की , ती केव्हापासून पाठ्यपुस्तकात आली , याचा आमच्याकडे संदर्भच नाही. त्यामुळे ती कदाचित पाठ्यपुस्तक मंडळानेच कधीतरी मनात आले म्हणून तयार करून छापली असेल व पुढे तिचा हिंदी व इंग्रजी भाषेतही अनुवाद झाला असेल! परंतु प्रत्यक्ष शोधानंतर ते तसे नसल्याचे सिद्ध झाले. ' भारत माझा देश आहे , सारे भारतीय माझे बांधव आहेत... ' ही प्रतिज्ञा भारतीय पातळीवर प्रत्येक राज्याच्या राजभाषेत भाषांतरित झालेली आहे. भारतात लिपी असणाऱ्या सर्व भाषांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ती दिसते. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून मी या प्रतिज्ञेच्या जनकाचा प्रश्नाचा शोध घेत होतो आणि शेवटी एकदाचा त्याच्या उगमापर्यंत पोहोचलो! आंध्र प्रदेशचे सुप्रसिद्ध तेलगू साहित्यिक पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी १९६२ मध्ये तेलगू भाषेत ही प्रतिज्ञा पहिल्यांदा लिहिली. परंतु त्यांचा नामोल्लेखही पाठ्यपुस्तकात कुठे आढळत नाही , याची खंत वाटते. आंध्रप्रदेशच्या नालगोंडा जिल्ह्यातील अन्नेपर्थी या गावच्या पेदेमरी व्यंकट सुब्बारावांचे संस्कृत , तेलगू , इंग्रजी आणि अरेबिक भाषांमध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण झाले होते. ते नॅचरोपॅथीचे तज्ज्ञ म्हणूनही परिचित होते. याचबरोबर विशाखापट्टणम् जिल्ह्याचे अनेक वर्षं ते जिल्हा कोषागार अधिकारी म्हणून सरकारी नोकरीत होते. त्यांची ' कालाभरवाहू ' नावाची तेलगू कादंबरी विशेष गाजली. मुळात राष्ट्रप्रेमाने प्रेरित झालेले , स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतले कवी पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी म्हणावी म्हणून ही प्रतिज्ञा १९६२ मध्ये लिहिली. त्यांच्या शिक्षण खात्यातील एका मित्राला ही कल्पना खूपच आवडली. त्याने आंध्रप्रदेशचे तत्कालीन शिक्षणमंत्री पी. व्ही. जी. राजू यांना ही प्रतिज्ञा दाखविली. शिक्षणमंत्र्यांनाही ती आवडली आणि त्यांनी ती शाळाशाळांमध्ये घेण्याचा आदेश दिला. केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत देशातील शिक्षणखाते कार्य करीत असते. या खात्याच्या वतीने शिक्षणामध्ये सातत्याने नवनव्या सुधारणा सुचविल्या जातात. यासाठी ' डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया ' या समितीची स्थापना केलेली आहे. या समितीचे अध्यक्ष केंद्रीय शिक्षणमंत्री असतात. या डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडियाची ३१वी सभा तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री एम. सी. छागला यांच्या अध्यक्षतेखाली ११-१२ ऑक्टोबर १९६४ला बेंगळुरू येथे झाली होती. या मिटिंगच्या वृत्तांतामध्ये (डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया - ए हिस्टॉरिकल सर्व्हे ऑफ एज्युकेशन डॉक्युमेंट बिफोर अॅण्ड आफ्टर इंडिपेन्डन्ट - या पुस्तकाच्या पान १४० वर) मुद्दा क्र. १८ मध्ये उल्लेख आढळतो की , विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना सदोदित जागृत राहण्यासाठी समितीच्या शिफारशीनुसार शाळा-महाविद्यालयांमध्ये , तसेच राष्ट्रीय दिवसांच्या शुभपर्वावर विद्यार्थ्यांसाठी एक प्रतिज्ञा असावी. याला अनसुरूनच पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी लिहिलेली India is My Country, All Indians are my brothers & sisters... ही प्रतिज्ञा देशपातळीवर स्वीकारण्याची शिफारस करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला व पुढे असेही सूचित करण्यात आले की , ही प्रतिज्ञा देशपातळीवर २६ जानेवारी १९६५ पासून लागू करावी. या प्रतिज्ञेचा देशपातळीवरील विविध भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आणि १९६५ पासून देशातील सर्वच राज्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये तिचा समावेश करण्यात आला. तसंच , या प्रतिज्ञेला फक्त पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेचा दर्जा न देता , तिला राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देशपातळीवर देण्यात आला. पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी ही प्रतिज्ञा १९६२ मध्ये प्रथम तेलगू भाषेत लिहिली होती.
२६ जानेवारी २०१२ला या प्रतिज्ञेचा सुवर्ण महोत्सव सुब्बारावांच्या मित्र परिवाराने साजरा केला. तेव्हा ' टाइम्स ऑफ इंडिया ' आणि दैनिक ' हिंदू ' या इंग्रजी वृत्तपत्रांत त्याविषयीची छोटीशी बातमी प्रकाशित झाली. या बातमीमुळेच माझ्यासारख्या आजच्या पिढीतील अनेकांना आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचा खरा लेखक कोण , याची माहिती मिळाली.
आपले राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान जसे अनुक्रमे रवींद्रनाथ टागोर आणि बंकिमचंद्र चटर्जी यांच्या नावे ओळखले जाते. तशीच ही राष्ट्रीय प्रतिज्ञाही पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या नावाने ओळखली जायला हवी. सुब्बारावांचे नाव या राष्ट्रीय प्रतिज्ञेशी जोडले जायला हवे. कारण प्रतिज्ञेचा जो आशय आहे , जे विचार आहेत ते प्रचंड विवेकवादी , समतावादी , एकात्म समाज घडविण्याचा वस्तुपाठ दर्शवितात. हा राष्ट्रीय प्रतिभेचा अमूल्य वारसा या प्रतिज्ञेच्या माध्यमातून भविष्यातही भावी पिढ्यांसाठी आपण जतन करणार आहोतच. यासाठी तरी पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या प्रतिभेचा सम्मान म्हणून या प्रतिज्ञेच्या खाली त्यांची नाममुद्रा असणे गरजेचे वाटते , म्हणजे भविष्यात आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचा लेखक कोण ? हा प्रश्न इतरांना पडणार नाही. याचे उत्तर प्रत्येक भारतीय नागरिकाजवळ असेल.
Friday, February 28, 2014
निवड - परीश्रमाने स्वत:वर पैलू पाडणारा ! श्रीमंत : एक अप्रतिम सुन्दर लेख
CHOICE : A Nice Marathi Moral Story
काढून वाचा.. आवडल्यास शेअर करावा.
मदत द्यायची आहे, तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा,ज्यायोगे
ही मदत योग्य विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला मिळेल !
खरोखर पंचाईतच होती. ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की,अगदी एक
विजार, एक सदरा असेल,तरी तो रोज धुऊन-वाळवून त्याची इस्त्री
केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात .
गरीब; तेही सर्वात गरीब म्हणून? मोठीच अडचण होती. तीन - चार दिवस नुसता अंदाज
बांधण्यात गेले. वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे ;पण लहान
मुलांमधे अडचणीचं .शेवटी दोन-चार मुलांना हाताशी घेतलं, जी गाडीने शाळेत यायची
आणि गाडीनेच घरी जायची.
विचारलं ," मला एक मदत कराल का? आपल्या वर्गातला सर्वात गरीब.......?"
मयूर आहे नं, तो सर्वात गरीब आहे."
"कशावरून म्हणता?"
" सर. त्याचा सदरा दोन- तीन ठिकाणी तरी फ़ाटलाय. त्याने शिवलाय; पण फ़ाटलेला
शर्ट घालतो. त्याची खाकी पॅंट तर नीट बघा
, मागून दोन ठिगळं लावलेली आहेत. चपला त्याला नाहीतच. मधल्या सुट्टीत आम्ही
डबा उघडतो . तो मात्र प्लॅस्टीकच्या पिशवीतून अर्धी भाकरी आणतो.सर,ती भाकरीही
कालचीच असते.भाजी कुठली सर? गुळाचा खडा असतो. आम्ही सांगतो,तो सर्वात गरीब
आहे. शाळेने त्याच मुलाला मदत द्यायला हवी ."
शक्य नव्हते. मयूर एवढा गरीब असेल? की सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरीबीचे दाखले
द्यावेत? कारण, मयूर वर्गातील सगळ्यात चपळ मुलगा होता. अक्षर स्वच्छ, मोकळं
होतं. त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन मला घडे. एकदा तर त्याची वही
मी माझ्या घरात पत्नीला दाखवली आणि म्हट्लं,
" पाहिलंस ! हे सातवीतल्या मुलाचे अक्षर.असं अक्षर असावं हे माझे स्वप्न
होते.उत्तराला सुबक परीच्छेद, समास सोडून योग्य प्रस्तावना आणि
अखेर करून लिहिलेली उत्तरे........." चे गठ्ठे आणायला मयूर सर्वात आधी धावत
यॆई.
माझ्याआधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा उत्साह मला थक्क करून टाकत असे
.
या गोष्टीचीच मला खंत वाटली .जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना उमगते आणि
मला त्याचा पत्ताही नसतो......अरेरे!..., मी खूप कमी पडतोय. मयूर , गेल्या सहलीला
आला नव्हता. अवघी पंचवीस रूपये वर्गणी होती ; पण त्याचं नाव यादीत नव्हतं. आपण
त्याला साधं विचारलंसुद्धा नाही.
पंचवीस रूपये नसल्याने त्याचे National Park बघण्याचे राहून गेले. एका छान अनुभवाला
मुकला होता तो.
हा आनंद मी हिरावला होता.यादीत मयूरचे
नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का बोलावलं नाही? मयूर स्वत:हून सांगणं शक्यच
नव्हतं आणि माझ्या व्यग्र दिनक्रमात मयूरसाठी जणू वेळच शिल्लक नव्हता!
नाव.
आर्थिक मदत, तीही भरघोस मदत मयूरला मिळायलाच हवी.आता शंकाच नव्हती.त्याची गरीबी
बघायला त्याच्या घरी जायचेही काहीच कारण नव्हते. मुलांनी एकमुखाने सुचवलेले
नाव आणि मयूरने सहलीला न येणं याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव देउन
टाकले
फ़ी, त्याचे शालेय शिक्षण साहित्य, गणवेश...इत्यादी सर्व या रकमेत सामावणार
आहे."
" सर, त्याची काळजीच करू नका. वर्गातला सर्वात गरीब आणि आदर्शही म्हणा हवं
तर-मयूर जाधवच आहे!"
मदत, त्यामुळे त्याचे आर्थिकद्रूष्ट्या सुसह्य होणारे शैक्षणिक वर्ष याची कल्पनाचित्रे
रंगवतांना दिवस कसा संपला ते कळालेच नाही.
देखण्या अक्षराच्या कदम सरांनी मोठ्या दिमाखाने फ़ळा सजवला होता.त्यावर 'गरीब
असूनही आदर्श ' असं म्हणून मयूरचं नाव होतं. शाळा भरली. मी अध्यापक खोलीत बसलेलो
होतो .इतक्यात खोलीच्या दाराशी मयूर उभा दिसला.
राग आवरावा तसा करारी चेहरा...
,डोळ्यातलं पाणी......मला कशाचाच काही अर्थ लागेना.मी ज्याचं अभिनंदन करायच्या
तयारीत,तो असा.....?
मी तर श्रीमंत आहे."
पाय पाहिले होते.शाळेच्या चौदा वर्षाच्या माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचाईत
प्रथमच आली होती.
आहे हे ठरवले कोणी? मी चुकतोय बोलतांना हे कळतंय मला; पण सर ते नाव तसंच राहिले
तर मी आजारी पडेन आज."
काय?"
कुठल्याही विषयाच्या.... त्या पूर्ण आहेत.पुस्तकं मी Second Hand वापरतोय
...खरयं ! पण मजकूर तर तोच असतो ना?
मनात काय उतरवतो ते महत्वाचे नाही का? सर,माझे पाचवीपासूनचे मार्क बघा, नेहमी
पहिल्या तीनात असतो. गेल्या वर्षी स्पोर्टसपासून निबंधापर्यंत सर्व बक्षिसे
मलाच आहेत.सर...सर,सांगा ना,मी गरीब कसा?"
थरारत होतं.
......."
म्हटल्यावर, मी वडीलांबरोबर रंगाच्या कामाला जाणं बंद करेन! "
.Contractor बोलावतो तेव्हाच काम मिळते. तेव्हा ते मला त्यांच्याबरोबर
नेतात.
चार पैसे मला मिळतात, ते मी साठवतो.
सर, संचयिका आहे ना शाळेची,त्यातलं माझं पासबुक बघा.पुढच्याही वर्षाची फ़ी
देता येइल एवढी रक्कम आहे त्यात...मुलांनी तुम्हाला काहीतरीच सांगितलेले
दिसते
.....म्हणून तुम्ही मला निवडलेलं दिसतं.
पण सर,मीच नाही तर आमचं घरच श्रीमंत आहे. घरातले सगले काम करतात. काम म्हणज
कष्ट. रंगाचं काम नसतं तेव्हा बाबा स्टेशनवर हमालीही करतात.आई धुणं-
भांडी करते. मोठी बहीण दुसरी-तिसरीच्या शिकवण्या घेते.सर,वेळ कसा जातो,दिवस
कसा संपतो ते कळतच नाही....शाळेतल्या वाचनलयातली पुस्तकं मीच सर्वात जास्त
वाचली आहेत.तुम्हीच सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही पत्र पाठवतो मी. सर,माझ्या
घरी याच तुम्ही,माझ्याकडे पु.ल. देशपांडे यांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे.
........सर,आहे ना मी श्रीमंत?"
शेजारच्या काकांकडून मी उरलेल्या वेळात पेटीही शिकलो.रात्री देवळात
होण्या~या भजनात मीच पेटीची साथ देतो.भजनीबुवा किती छान
गातात! ऐकताना भान हरपून जातं
."
?"
बैठका काढतो ."
आहे त्याचा .."
; पण याचं रूपांतर वेगळ्या शिष्यवॄत्तीत होईल. शाळेतील सर्वात अष्टपैलू बुद्धिमान
मुलगा म्हणून, हे पारितोषीक तरी........."
वाचलं ,हेलन केलरचं चरित्र वाचलं.सर, हे वाचलं की कळतं की ही माणसे केवढे कष्ट
करून मोठी झाली. माझ्यासारख्या मुलांना प्रोत्साहन द्या, योग्य वयात ते परखड
मार्गदर्शन करा; पण सर, नको त्या वयात असा पैसा पुरवत गेलात तर घडायचं
राहूनच
जाईल. जे काय करतोय ते पैशासाठी असे हॊऊन जाईल... सर.....प्लीज.....!"
वाचनानं, स्पर्धांतल्या सहभागानं , कलेच्या स्पर्शानं ,कष्टानं....... त्याच्या
वाणीला प्रगल्भतेची खोली होती,संस्कारामुळे नम्रतेची झालर होती . आता मला माझ्या
समोरचा मयूर जाधव स्पष्ट
दिसतही नव्हता. त्याच्याबद्दलच्या कौतुकाचे अश्रू माझ्या डोळ्यात दाटले
होते.
परीश्रमाने स्वत:वर पैलू पाडणारा ! श्रीमंत!
Other Best Marathi Moral Stories :
एक धनगर
वाचलेच पाहिजे असे काही
Tuesday, February 25, 2014
Whatsapp funny marathi post message: Marathi Fun
Marathi Fun on WhatsApp
राग
कोणाचा येतो?????
(बंड्या उठला आणि म्हणाला)
.
.
मास्तर : का रे बंड्या ????
बंड्या : कारण, त्यांनी 'बालविवाह' बंद
केला.....
त्यांनी बालविवाह बंद केला नसता तर
आज
आम्ही जोडीने शाळेत
आलो असतो .
आली लहर केला कहर...
चंप्या - तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो.
गुरूजी - सगळ्यांनी आपल्याला काय आवडतं ते सांगा. बंड्या तू सांग बरं.
बंड्या - मला कविता आवडते.
गुरूजी - वा वा. कोणती कविता आवडते?
बंड्या - ती तिस-या बाकावरची.
------------------------------------------------बायको : माझ्या आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर सुखी झाले असते...
आत्ताच ब्युटी पार्लर मध्येजाऊन आली.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बॉयफ्रेँड- मग ??
बंद होतं का ब्युटी पार्लर?
" माझी मैत्रीण येणार आहे. दोन दिवस
तुम्ही बाहेर झोपा. "
.
.
नवरा :
" बरं .. पण वचन दे ..
.
.
.
.
.
माझी मैत्रीण आली की तू पण दोन दिवस
बाहेर झोपशील ..
------------------------------------------------------------
लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोशी काय बोलावं ते बंड्याला कळंत नव्हतं...
गोष्ट सांगितली......
" एक बाप होता....त्याने त्याच्या ३
मुलांना प्रत्येकी १०० रुपयेदिले
आणि संगितले
की अशी वस्तु आणा ज्याने आपली रूम भरून
जाईल.....
पहिल्या मुलाने १०० रुपयाचे लाकडं
आणले.....
पण ते पुरेशे नव्हते.. दुसर्या मुलाने १०० रुपयाचा कापूस
आणला.....पण
तो पुरेसा नव्हता...
आणि
तिसर्या मुलाने ५
रुपयाची मेणबत्ती आणली,ती पेटवली व
प्रकाशाने
पूर्ण रूम भरून गेली......"
पुढे कपिल सिब्बल उठला आणि म्हणाला ,
'तो तिसरा मुलगा म्हणजेच राहुल गांधी....
जेंव्हापसून ते देशाच्या राजकरणात उतरले
आहेत...देशाची प्रगति झाली आहे'
.
.
.
तेवढ्यात खालून 'अण्णा हजारे'
यांचा आवाज आला.....
.
.
.
"ते सर्व ठीक आहे.....पण बाकीचे ९५रुपये
कुठे
गेले ???
मध्यमवर्गीय मद्यपान करतो,
तर श्रीमंत लोक ड्रिंक्स घेतात !
काम केल्यावर मध्यमवर्गीय गृहस्थाला पगार मिळतो,
तर काम केल्यावर ऑफिसर लोकांना सॅलरी मिळते !
मध्यमवर्गीय माणुस करतो ते प्रेम,
तर श्रीमंत व्यक्ती करतात ते अफेअर !
शब्दाने शब्द वाढला की भांडण होते
शब्दाने शब्द वाढत गेले की लेखकाची रॉयल्टी वाढते...
--- आयुष्य हे सुंदर असतं
हे ज्याच त्याने ठरवायचं असतं...!
अपना बजाज मधे सुख शाेधायचं
संस्कार जाेपासून सुसंस्कृत व्हायचे
त्यांच्या उतार वयात वृध्दाश्रमाचा चेक फाडायचा.
हे ज्याच त्याने ठरवायचं असतं....!
मराठी पणाच्या चौकटीत स्वतःला जखडून ठेवायचं
आपल्या सानुल्यासोबत सारीपाटात रमायचं.
समाजाच्या जोखडीत वेळोवेळी मरांयच
हे ज्याच त्याने ठरवायचं असतं....!
विजय मल्याचा बिझनेस वाढवायचा.
निवडुंगाचे
कुंपण घालून विचार खुंटवायचे.
का
एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं.
हे ज्याच त्याने ठरवायचं असतं...!
ती म्हणे,नवे काय? रोजचेच रडे
ती म्हणे बरं..! मुलांना सोबत घेऊन जाऊ
ती मात्र जुनी.. तशीच अॅन्टिक !
तुझ्यातली प्रेयसी हवी
तिने हसत म्हणाली, तुम्हांला काय..!
रोज नवी फॅण्टसी हवी
हाती हात घेऊन घटकाभर जवळ बसलीस तरी
आणि मधाळंसं हसत पुन्हा फुलून गेली
वेड्या........!
हा 'वॅलेनटाइन डे ' फक्त
वर्षातून एकदाच साजरा होतो..
तुझ्या नजरेनं माझा चेहरा मात्र
कुठल्याही 'डे' ला लाजरा होतो..
कॅण्डललाइटचं टेबल लागत नाही
अन एकरुप झालेल्या जीवांना
'वॅलेनटाइन 'चं लेबल लागत नाही
मिळणारच...!
मुलगा :- नादच खुळा...
वडील :- पास झालास तर Pulsar 180 .. college
ला जायला...,
नापास झालास तर M80.. रानात वैरण
आणायला जायला आणि दुध घालायला...!!!
भारताचा राष्ट्रीय प्राणी, बाघ ----धोक्यात.
भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर ----धोक्यात.
भारत कृषिप्रधान देश ,
भारताचा शेतकरी ------ धोक्यात.
भारताची सीमारेषा ------ धोक्यात.
भारताचा सैनिक ------ धोक्यात....
भारताच आर्थिक चलन ------ धोक्यात.
भारताच पर्यावरण ------धोक्यात .भारताच विधानभवन ------ धोक्यात..
भारताच्या बस,ट्रेन,विमान----- धोक्यात
भारताची संस्कृती ------ धोक्यात.
भारताची महिला ------धोक्यात.भारताचा इतिहास/वर्तमान/भविष्य ------अंधाराततर
मग कायघंटा होत आहे " भारत निर्माण.
विचार करा जाब विचारायालाच हवा
ईतकी शेअर करा पोस्ट कि प्रत्येक जण आता जागा झालाच पाहिजे
For more funny Marathi post messages see our another post :
भयानक मराठी PJ - WhatsApp Jokes Collection
काही विनोद , काही कविता , काही असेच
पोस्ट आवडल्यास खाली आपले कमेंट्स करायला विसरू नका.
Wednesday, February 12, 2014
व. पु. काळे यांचे चार शब्द
Via Pu Kale : Quotes to remember.
व. पु. काळे यांचे चार शब्द जरुर वाचा...
⚪ कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे.
⚫ पाण्यात राहायचे तर माश्यांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वत:ला मासा बनावे लागते.
वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते, प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंझ देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.
🔵 कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.
⚪ आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यंतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.
⚫ समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचिवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.
संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.
🔵 'अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.
⚪ वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!
⚫ खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
🔵 चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस!
⚪ तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
⚫ औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं.
गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले!
🔵 अत्यंत महागडी, न परवडणारी खर्या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य".
⚪ भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती!
⚫ आपण किती पैसा मिळवला यापेक्षा, तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले, हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो.
Tuesday, February 11, 2014
आणखी बोलक्या रेषा - Bolkya Resha
बोलक्या रेषा
All rights of Bolkya Resha reserved by Bolkya Resha: Jivanatil Kahi Hasyachitre, Ghanshyam R Deshmukh : Bolkyaresha art studio, illustrations, cartoons, comics, bolkya resha marathi cartoons.
Profile of Mr. Ghanshyam R Deshmukh can be found here: http://www.bolkyaresha.marathi-unlimited.in/about-us/
Thanks to this great cartoonist for his work.
Wednesday, February 5, 2014
Sukh - सुख A Nice Book By Mr. Ganesh Shinde
Sukh सुख
Saturday, February 1, 2014
फाळणी - Poem By Saurabh Vaishampayan
परवाच एका स्फोटात मेलो
पहिल्याच झटक्यात स्वर्गात गेलो
स्वर्गात जाण्याचा एकच कायदा होता
सरळ जाण्याचा हाच एक फायदा होता ---१
स्वर्गात जाताच टिळक भेटले
नमस्कार म्हणताच प्रसन्न हसले
,-- टिळकांनी विचारले...
कय रे स्वातंत्र्यानंतर काही बदललंय का नाही?
म्हटलं, छे हो, सरकारचं डोकं ठिकाणावर नाही
तिथून लगबगीने सुभाषबाबु आले
विचारु लागले खाली नेमके काय झाले? -- २
मी म्हणालो, नेताजी काय काय म्हणुन घडतय
हल्ली
फक्त आमदारच म्हणतात चलो दिल्ली!
नेताजी, आजही आम्ही स्वातंत्र्यासाठी रक्तच
देतो,
फक्त 'खुन' आमचं असतं आणि आझाद काश्मिर
होतो! --३
तितक्यात... दुरवर सावरकर दिसले म्हणुन
धावलो,
म्हटलं 'तात्या' आज जन्माचं पुण्य पावलो
म्हटलं सध्या तरी सगळं कसं निवांत आहे
स्वर्गात कॉंग्रेस वाला नाही तर सगळं कसं शांत
आहे. --४
त्यांनाच विचारलं..
तात्या इथे सध्या शिवराय कुठे हो राहतात?
म्हणाले, ते पहा सौधातुन आपल्याकडेच पाह्तात!
'छत्रपतिंचा विजय असो'म्हणुन चटकन हात
जोडले
पण घडलं भलतच, ते माझ्यावरच ओरडले,
-काय रे? कोणत्या जेम्स लेनने म्हणे
बत्तमिजी केली?
तुमची अक्कल तेव्हा सांगा कोठे चरायला गेली?
--५
मान वर करायची माझी हिम्मत होत नव्हती
आणि महाराजांची नजर माझ्यावरून ढळत नव्हती!
कबुल आहे महाराज, तुमची स्वप्नं
आम्हाला कळलीच नाही
पैसा सोडुन आमची नजर, दुसरीकडे वळलीच नाही
पण रक्षणकर्तेच लांडग्यांसारखे सावज हेरतात
ब्र म्हणायचा अवकाश, लगेच गाढवांचे नांगर
फिरतात. --६
सगळं ऐकुन महाराजांच्या गालावरचे कल्ले थरारले
आमचं केविलवाणं जगणं बघुन डोळ्यांत
पाणी तरारले,
क्षणभर राजेपण विसरुन ते दुःखाने थरथरले,
आणि मग आमचं अस वागणं बघुन रागाने
बिथरले. --७
पाय लटपटले...
वाटलं आता कम्बख्ति भरलीच म्हणुन समज,
चुकीची शिक्षा, आता गर्दन मारलीच म्हणुन
समज
पण मेलेल्याला मारायला ते 'खुर्चीतले नेते'
नव्हते,
न्याय-कठोर असले, तरी ह्रदय त्यांचे 'रीते'
नव्हते. --८
म्हणाले, नांव सांग फक्त, खाली जाऊन समाचार
घेतो,
सांगितलं खाली 'लोकशाही'त प्रत्येकाचा विचार
होतो,
खाली आता न्याय बरेचदा विकत मिळतो
आणि पैसेवाला दुस-यांच्या जिवाशी खेळतो --९
फक्त एकच काळवीट मारले म्हणत आपले
माजोरडे नाक उडवतो,
कोणीही आपल्या गाडीखाली गरिबांना चिरडतो
महाराजांनी मुश्किलीने डोळ्यांतलं पाणी अडवलं,
कळलं हेच पातक आम्ही आयुष्यभर घडवलं.
--१०
मान खाली घालुन मग तसाच पुढे गेलो...
अहो आश्चर्यम! स्वर्गामध्ये औरंग्या भेटला
म्हणे काफरांना मारुन तर स्वर्ग गाठला.
जिन्हा सुद्धा होता तिथेच,
म्हणाला, लवकरच आमची संख्या इथे लाखांवर
जाईल,
आणि एके दिवशी मग
स्वर्गाची सुद्धा फाळणी होईल... --११
कवी- सौरभ वैशंपायन
Out dated झालंय आयुष्य - Marathi Poem
(शिक्षक -कोल्हापूर) यांनी लिहिली होती. कविता पठण स्पर्धेत त्यांना
पहिला नंबर मिळाला. (Award winning Marathi Poem by Mr. Bablu Vadar)
स्वप्नही download होत नाही
संवेदनांना 'virus' लागलाय
दु:खं send करता येत नाही
delete झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं
range नसलेया mobile सारखे
मातीची स्थिती वाईट
जाती माती जोडणारी
कुठेच नाही website
पीढी भलतीच 'cute'
contact list वाढत गेली
संवाद झाले mute
माणूस मनानं खुजा झालाय
अन 'mother' नावाचा board,
त्याच्या आयुष्यातून वजा झालाय
आता संस्कारांनाच जागा नाही
अन फाटली मनं सांधणारा
internet वर धागा नाही
केवढी मोठी चूक
रक्ताच्या नात्यांनाही
आता लागते facebook................
Sunday, January 19, 2014
Best Cartoons by Balasaheb Thackeray
Best Cartoons by Bal Thackeray
महाराष्ट्राच्या या वाघाला आणि त्यांच्या कलेला मानाचा मुजरा.
Friday, January 10, 2014
मराठी Girlfriend ची ठळक वैशिष्ट्ये…
Characteristics of Marathi Girlfriend.
१. जर तिची ओळख तुम्ही “माझी Girlfriend”
म्हणून करून दिली तर
ती रागावते.
२. चारचौघांसमोर जर तुम्ही तिला मिठी मारली तर
ती “जन गण मन”
गायला सुरु करते.
३. तिच्या आईला आपण “मावशी” किंवा “काकू”
म्हणतो.
४. समजा जर भयंकर जोराचं वादळ सुटलं
आणि विजा कडाडल्या, तर
हिंदी सिनेमातल्या नायिकेप्रमाणे ती तुम्हाला कधीच
मिठी मारणार नाही.
५. तुमच्याबद्दल जर तिला कोणी विचारले तर लाजेने
ती लालबुंद होते.
६. ती सहसा जीन्स आणि टाइट टी शर्ट वापरत
नाही पण हे मात्र गॄहीत धरून
चालते की तिचं करिअर तुमच्या करिअरइतकंच
महत्त्त्वाचं आहे.
७. तिला शाळेतल्या सगळ्या कविता आठवतात.
८. ती नेहमी “अमके अमके” सरांबद्दल बोलते….
आणि तुम्ही मनातल्या मनात
म्हणता….” काय पकवते आहे”.
९. राखी पौर्णिमेच्या दिवशी ती तुम्हाला भेटत नाही.
१०. तिचा भाऊ कधीच तुमचा मित्र नसतो.
११. घरात तुमच्या आवडीचा पदार्थ केलेला असेल
तर ती आठवणीने डब्यात घेउन येते.
१२. तुमची DATING कुठल्या तरी रेस्तौरन्त मधे
नसून
चतुर्थीच्या दिवशी लालबागच्या राजा किंवा सिद्धीविनायकाच्या मंदिराजवळ
असते …
That is Called Marathi Girl friend